घरव्हिडिओतक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई व्हावी

तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई व्हावी

Related Story

- Advertisement -

कल्याणमधील मलंगगड परिसरात दोन तरुण आणि तरुणींना तोकडे कपडे घालण्यावरुन मारहाण केली आहे. इतकंच नाही तर त्यांनी दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचा देखील प्रयत्न केला. तरुणींनी कोणता पेहराव करायचा हे ठरवणारे तुम्ही कोण?, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. हा प्रकार घडल्यानंतर तरुण-तरुणींनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली. मात्र, त्यांची पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली नाही. तक्रार दाखल करुन न घेणाऱ्या पोलिसांवर देखील कडक कारवाई व्हायला हवी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

- Advertisement -