- Advertisement -
तब्बल २० वर्षांनी पाकिस्तानातून भारतात परतलेल्या राधा वाघमारेची अखेर तिच्या कुटुंबियांशी भेट झाली आहे. ट्रेनमध्ये बसून पाकिस्तानमध्ये आलेली गीता म्हणजेच राधा वाघमारे ही मुकी आणि बहिरी होती. त्यामुळे तिची ओळख शोधण्यासाठी १५ वर्षांचा कालावधी लागला होता. एधी फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या प्रयत्नांनी तिची खरी ओळख समोर आली आणि तिची तिच्या आईशी भेट झाली. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यामुळे ती भारतात येवू शकली. गीताचा हा पाकिस्तान ते नायगावचा प्रवास खूप खडतर होता. पण आता अखेर ती तिच्या मूळ स्थानी परतली आहे. आणि जीवनाच्या नव्या प्रवासाला राधाने सुरुवात केली आहे.
- Advertisement -