- Advertisement -
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत झालेल्या उमेदवारांना अजित पवार यांनी चांगलाच टोला लगावला आहे. तुम्ही तळ्यात – मळ्यात होता म्हणूनच लोकांनी तुम्हाला टाळलं, असा थेट आरोप करत यापुढे तरी नीट काम करा, असे अजित पवार म्हणाले. आज शरद पवारांनी अशी परिस्थिती आणलीये की, गेलेले सुद्धा फोन करुन ‘येऊ का’ म्हणत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
- Advertisement -