- Advertisement -
जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र सरकार पर्यटन विभागातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज्यातील पर्यटन सुधारण्यासाठी विभागाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही सूचना दिल्या आहेत. पर्यटकांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याकडे लक्ष देण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. तसेच पर्यटनस्थळी असलेल्या निवासस्थानावर चादर पलटी करतात एखादा बारकाईनेही तपासून बघतात. माझ्यासारखा तर एखादा केस कुठे पडलाय का हे आधी पाहतो. त्यामुळे चांगल्या सुविधा द्या. उगाच चादर पलटी धंदे नको. यामुळे पर्यटन क्षेत्राचे नुकसान होत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे
- Advertisement -