- Advertisement -
मागील पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी संपावर सभागृहात निवेदन दिले आहे. यावेळी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर रुजू होण्याचे आवाहन अनिल परब यांनी केले आहे. संपकरी कर्मचाऱ्यांच्या सर्व कारवाया मागे घेण्यात येतील, असं परब म्हणाले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी येत्या ३१ मार्च पर्यंत कामावर रुजू व्हावं, असं आवाहन देखील परबांनी सभागृहात केलं आहे.
- Advertisement -