- Advertisement -
मालाड पूर्व येथील आप्पा पाडा झोपडपट्टीला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत अनेक दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे बोर्ड परीक्षांचे हॉल तिकीट, वह्या-पुस्तके जळून राख झालेली आहेत. त्यामुळे शासनाने येथील विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात आणि त्या पुढील महिन्यात घेण्यात याव्यात अशी मागणी येथील दहावी-बारावीचे विद्यार्थी तसेच पालकांकडून करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते दिपक सोनावणे यांनीही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची शासनाने काळजी घ्यावी अशी मागणी केली आहे.
- Advertisement -