- Advertisement -
मुंबईतील एका हाऊसिंग सोसायटीत बोगस पद्धतीने लसीकरण सुरू असल्याचा दावा सोसायटीतील नागरिकांनी केला आहे. लसीकरण शिबीर आयोजित करून सोसायटीतील ३९० जणांना लस देण्यात आल्याची माहिती समोर आली. या आरोपानं खळबळ उडाली असून लस घेतल्यानंतर कुणालाही मेसेज आला नाही तर ज्या रुग्णालयांच्या नावे प्रमाणपत्र दिले गेले त्या रुग्णालयांनी आपण लसीकरण शिबीर घेतलं नसल्याचा खुलासा केला आहे. यामुळे लस घेतलेले नागरिक हादरले आहेत. याबाबत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केंद्रावर टीका केली आहे. केंद्र सरकारचे लसीकरणाबाबत प्लनिंग अपयशी असल्याची टीका त्यांनी केली आहे.
- Advertisement -