- Advertisement -
भाजपच्या वतीने आज मुंबईत सर्व प्रशासकिय महानगर कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. हा तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे, असे वक्तव्य आशिष शेलार यांनी केले. हे आंदोलन ज्यांना निवडणूकीसाठी असल्याचे वाटत असेल तर त्यांच्या डोक्यात पिवळी झाल्यासारखी निवडणूक बसली आहे. भाजपसाठी हे आंदोलन निवडणूकांसाठीचे आंदोलन नसून हा मुंबई वासीयांसाठी संघर्ष लढा असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले.
- Advertisement -