- Advertisement -
भाजपचे आमदार ॲड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर जोरदार तोफ डागली आणि मलिक यांचा राजीनामा घेवून त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना साद घातली. देशहितासाठी उद्धव ठाकरे यांनी ताठ मानेनं उभं रहावं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दबावापुढे झुकू नये, असा सल्लाही शेलार यांनी दिला.
- Advertisement -