- Advertisement -
शिवसेतून शिंदे गटाने फारकत घेतल्यानंतर त्यांच्याविरोधात गद्दारी, खोकेवाले आमदार, पाठित खंजिर खुपसला असे आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येताय. गेले सात महिने झाले सरकार स्थापन होऊन तरी खोक्यांचा, गद्दारीचा शिक्का शिंदे गटाच्या आमदारांचा पिच्छा सोडत नाहीये, मात्र शिंदेंच्या शिवसेनेव्यतीरिक्त बंडाळीमध्ये शामिल झालेले आमदार बच्चू कडू यांना तर आता या खोक्यांच्या आरोपांनी सळो कि पळो करुन सोडलंय. ‘आमची स्वत:ची पान टपरी आहे, स्वत:चा पक्ष आहे’ असं बच्चू कडू म्हणताय नेमकं प्रकरण काय?, बच्चू कडूंनी शिंदेसोबत जाऊन चूक केली का? असा सवाल उपस्थित होतोय….
- Advertisement -