- Advertisement -
जरी वेगवेगळे पक्ष असले तरी त्यात संवाद होणं हे महत्वाचं आहे. चौथ्या जागेच्या विजयासाठी मतदान आमच्याकडे आहे आणि हेच आम्ही दाखवून देत होतो. आमच्याकडे सदस्यांचे संख्याबळ सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर काँग्रेस मधली नाराजी ही मला फक्त वृत्तवाहिन्यांवरच दिसते आहे. प्रत्यक्षात नाही. भाजपाची कार्यप्रणाली, विचारसरणी हि वेगळी आहे आणि ती आम्हाला मान्य नाही. त्याचबरोबर आम्ही तीनही पक्ष एकत्र असलो तरी आम्हाला आपापला पक्ष वैयक्तिकरित्या वाढवण्याची मुभा आहे. असं म्हणत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना आपलं मत मांडलं.
- Advertisement -