- Advertisement -
राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निवडणुका घेण्यात येऊ नये अशी महाविकास आघाडी आणि सत्ताधाऱ्यांची मागणी आहे. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भाजप नेते राज्य निवडणूक आयुक्त यू पी एस मदान यांच्या भेटीला गेले होते. यावेळी राज्यातील निवडणुका ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यावर घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. तसेच राज्यातील पावसाळ्याची परिस्थितीही समजवून सांगितले आहे. यानंतर आता राज्य निवडणूक आयोग पुन्हा परिस्थितीचा आढावा घेणार आहे
- Advertisement -