- Advertisement -
मुंबई महापालिकेने नुकतीच पालिका आयुक्तांची बदली केली आहे. प्रवीणकुमार परदेशी यांच्या जागी इकबाल सिंग चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि मुंबई महापालिका युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. मात्र मंत्रालय आणि पालिका प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव पाहायला मिळत असून त्यामुळे आयुक्तांची बदली करावी लागत असल्याचा आरोप भाजपचे नेता आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. आपली जबाबदारी झटकण्यासाठी आयुक्तांची बदली हा मार्ग नाही, असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
- Advertisement -