- Advertisement -
येत्या २६ तारखेला राज्यभरात भाजपकडून ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले जाणार आहे. कल्याण डोंबिवलीसह अन्य भागात हे आंदोलन कशा प्रकारे केले जाईल यासाठी भाजपकडून एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस भाजप आमदार रविंद्र चव्हाण हे कार्यकर्त्यांना आंदेलन कसे करायचे हे सांगताना दिसून येत आहेत. सरकारचे या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी उग्र आंदोलन करण्याचे ते सांगत आहेत. कार्यकर्त्यांना ते सांगत आहे की, ‘लपून छपून टायर घेऊन या. चक्काजाम करा टायर कशासाठी आणला जातो हे सांगण्याची गरज नाही. चक्का जाम करण्यासाठी त्याचा वापर करा असे सांगत आहेत.
- Advertisement -