- Advertisement -
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर येथील सर्व दुकाने, खासगी आस्थापने व खासगी कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधे, दूध, भाजीपाला इत्यादी दुकाने सुरू असतील. शुक्रवारी रात्री 12 वाजेपासून हे आदेश अमलात आणले आहेत. मात्र असं असूनही मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन केले जात नाहीये. माहिममधील मच्छिमार्केट सुरू आहे. इथल्या मच्छिमारांनी आपण जनता कर्फ्यू पाळणार असल्याचं म्हटलं आहे.
- Advertisement -