- Advertisement -
मुंबई कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असताना मुंबईकरांनी माझं घर माझा गणपती, माझं मंडळ माझा गणपती या संकल्पनेच्या आधारावर कमी गर्दी करत गणपती उत्सव साजरा करावा, अशा सूचना मुख्यमंत्री दिल्या आहेत. मुंबईसह महाराष्ट्र तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळेच नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपूरमध्ये तिसरी लाट आल्याचे सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे गर्दी न करता नागरिकांनी गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.
- Advertisement -