- Advertisement -
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांमध्ये केवळ महाराष्ट्रातील दोन महापालिकांमधील मेट्रो प्रकल्पांसाठीच निधीची तरतूद केली आहे. त्यामुळेच आता फक्त भाजपच्या नेत्यांच्या मर्जीनुसारच महाराष्ट्रात निधी मंजुर झाला का ? असा सवाल महाराष्ट्रातील इतर पक्षांकडून विचारण्यात येत आहे. मुंबई महानगरात मेट्रोचे ३३० किलोमीटरहून अधिक महाकाय असे जाळे विकसित होत असताना मुंबईला मात्र या अर्थसंकल्पात एकही रूपया देण्यात आलेला नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्पांमध्ये असा दुजाभाव का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- Advertisement -