- Advertisement -
बिहार मधून महाराष्ट्रात अल्पवयीन मुलांची तस्करी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात मनमाड रेल्वे स्थानक येथून ३० तर भुसावळ स्थानक येथून २९ मुलांची सुटका करण्यात एका सामाजिक संस्थेसह भुसावळ रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलिस भुसावळ यांना यश मिळाले आहे. गुप्त माहितीच्या आधारे ८ ते १५ वयोगटातील मुलांची मानवी तस्करी होत असल्याचे समजल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
- Advertisement -