- Advertisement -
दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी सुरु असलेल्या तपासावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, दीपाली चव्हाण यांचा मृत्यूनंतर देखील छळ केला जातोय. खरंतर दिपालीला न्यायची गरज आहे. एका महिला तहसीलदाराची ‘हरासमेंट’ सुरु आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर सरकारने अद्याप नेमणुक केली नाही. सरकारने महिला सुरक्षेची जणू व्याख्याच बदलली आहे. राज्यात सत्तेचे बेलगाम घोडे उथळले आहेत. सरकार विकृतांना राजाश्रय देण्याचे काम करीत आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला.
- Advertisement -