- Advertisement -
बाबरी मशीद कोणी पाडली यावरुन राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा रंगली आहे. शनिवारी शिवसेनेची मुंबईतील बीकेसी मैदानावर जाहीर सभा पार पडली यावेळी राज्याचे मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाबरी प्रकरणावरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. “देवेंद्र फडणवीस तुम्ही जर खरंच तिकडे गेला असता तर तुमच्या फक्त वजनाने बाबरी खाली आली असती.” अशा मिश्कील अंदाजात त्यांनी फडणवीसांना टोला लगावलाय
- Advertisement -