- Advertisement -
कोकणातल्या लोकांनी मुंबईकरांना आवाहन केले आहे की, यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात येऊच नये. तर दुसरीकडे मुंबईकरांना गणेशोत्सवासाठी कोकणात जायचे आहे. दोघांचीही भावना योग्य असली तरी कोरोनाचे संकट ओळखूनच पुढचे निर्णय घ्यावे लागतील, अशी भूमिका खासदार अरविंद सावंत यांनी माय महानगरच्या फेसबुक लाईव्ह दरम्यान व्यक्त केली.
- Advertisement -