- Advertisement -
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी
येथील ईश्वर नथुसिंग पाटील यांच्या मालकीच्या दोन एकर कपाशी लावलेल्या शेतावर अज्ञाताने तननाशक फवारल्याने नुकतेच उगवण झालेल्या कपाशीची रोपे जळाली आहेत. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सदर घटनेचा तपास बीट हवालदार राजेश खोंडे आणि त्यांचे सहकारी करीत असून अशी विकृती करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकरी ईश्वर पाटील यांनी केली आहे.
- Advertisement -