- Advertisement -
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र, रमजान ईद आणि अक्षयतृतीयाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस प्रशासनाकडून लॉकडाऊनमध्ये शिथिलता करण्यात आली होती. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणताच एपीएमसी मार्केटमध्ये नागरिकांनी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यावेळी कित्येक नागरिकांनी तोंडाला मास्क सुद्धा लावला नव्हता. तर सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजल्याचे चित्र यावेळी दिसून आले. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या शिथिलतेचा गैरवापर होताना दिसून येत आहे.
- Advertisement -