- Advertisement -
उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी परिसरात गुरवारी रात्री ११च्या सुमारास जोरदार वाऱ्यासह अवकाळी गारपीठ झाली. जोरदार वाऱ्याने शेतातील शेडचे पत्रे पत्याप्रमाणे उडून गेले तर अनेक वीजेचे खांब तुटल्याने तारा जमीनीवर पडल्या होत्या. या अवकाळी तडाख्यात आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले असून शेतात राहणारे शेतकरी भयभीत झाले.
- Advertisement -