- Advertisement -
राज्यातील महाआघाडी सरकारविरोधात टीका करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला यांनी पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांतील कथित भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. हा अहवाल आणि शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगचं बिंग फुटल्याने त्या स्वत: अडचणीत आल्याच. पण, त्यांचा अहवाल केंद्रीय गृहसचिवांपर्यंत पोहोचवणारे विरोधी पक्षनेतेही बॅकफुटवर आले. आता हा अहवाल अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी फोडल्याचं सांगत ते स्वत:चा बचाव करत आहेत. यामुळे रश्मी शुक्ला यांचा कथित अहवाल विरोधकांच्या बोकांडी बसला आहे.
- Advertisement -