- Advertisement -
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असं जोरदार राजकारण रंगलं. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. तसेच सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी एकमेकांवरील जबाबदारीही झटकण्याचं काम सुरु केले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाबाबत भाजप कोअर कमिटीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. मराठा आरक्षण रद्द होण्यास सर्वस्वी महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजपनं केला आहे.
- Advertisement -