- Advertisement -
‘सध्या राज्यात नवे प्रकल्प सुरू करण्याऐवजी जे प्रकल्प आधीपासून सुरू आहेत, ते प्रकल्पच बंद केले जात आहेत. त्यात नागपूरचं अधिवेशन फक्त ५ ते ६ दिवसांचं घेतलं जात आहे. आमची अशी मागणी होती की राज्यासमोर सध्या असलेल्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन किमान २ आठवडे घेतलं जावं. पण ती मागणी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली नाही. त्यामुळे हे अधिवेशन फक्त औपचारिकताच आहे’, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
- Advertisement -