- Advertisement -
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यासाठी व त्यांच्या पाडवा गोड जाण्यासाठी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. विरोधकांच्या या आंदोलनावर राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी टीका केली आहे. नुसत्या घोषणा दिल्याने मदत पोहोचत नाही, अशा शब्दांत दीपक केसरकर यांनी टोला लगावला.
- Advertisement -