- Advertisement -
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरुन गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. त्याच दरम्यान, नवी मुंबईचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी राज ठाकरेंनी विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्या, असे म्हटले. या विमानतळाला दि.बा.पाटील यांच नाव देण्याची जोरदार मागणी या भागातून होत आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारला हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यायचे आहे. त्यातच राज ठाकरे यांनी मुंबईच्या या विस्तारीत आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव राहाव, अशी मागणी केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजकीय कोंडीत सापडलेत.
- Advertisement -