- Advertisement -
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड मोखाडा जव्हार येथील भागात पाण्याची मोठ्या प्रमाणात समस्या आहे. महिलांना सुकलेला विहिरींवर आपल्या पाण्याचा कॅन किंवा कळशी भरण्यासाठी तास न् तास उभे राहावे लागत आहे. तसेच विहिरी सुकल्यामुळे नदीकाठी खड्डे करून खड्ड्यांमध्ये जमलेले पाणी वापरून आपले दिवस काढावे लागत आहेत. पाण्यासाठी मोठी पायपीट करताना इथले नागरिक दिसत आहेत. हे करताना कोरोनासाठी घ्यावी लागणारी काळजी हा इथल्या स्थानिकांसाठी गौण मुद्दा ठरत असून जगण्यासाठी पाणी मिळवणं हेच काय ते ध्येय उरलं आहे.
- Advertisement -