- Advertisement -
राज्यात ओढवलेल्या पुरस्थितीने सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचल्यामुळे दळणवळण ठप्प झाल्याने दूध वितरणावर मोठा परिणाम झाला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे दूध वाहून आणणाऱ्या वाहनांची वाहतूक बंद झाल्याने शहरांमध्ये दुधाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.
- Advertisement -