- Advertisement -
महाराष्ट्र सरकारमधले गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनावर विजय मिळवल्यानंतर आपली चूक झाल्याचं मान्य केलं. या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे देखील बाहेर लोकांमध्ये फिरताना काळजी घेत नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे नक्की एकनाथ शिंदे असं का वागत आहेत? बाहेर फिरताना पुरेशी काळजी का घेत नाहीयेत, अशी चर्चा सध्या ठाण्याच्या राजकीय वर्तुळात आणि सामान्य नागरिकांमध्ये देखील सुरू आहे.
- Advertisement -