- Advertisement -
नांदेडमधील नांदुसा गावाचे सरपंच भास्कर जानकवडे यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. या गावातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झालेले आहे. नांदेड-हिंगोली दौऱ्यादरम्यान या शेतकऱ्यांची भेट घेण्याचे राहिल्यामुळे त्यांनी खास व्हिडीओ कॉल करून या शेतकऱ्यांची चौकशी केली. हे सरकार सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी जनतेचे सरकार असून येत्या मंत्रिमंडळ बैठकीत ठोस निर्णय घेऊन सर्व शेतकऱ्यांना नक्की दिलासा देऊ, असे शिंदे यांनी या शेतकऱ्याला आवर्जून सांगितले.
- Advertisement -