- Advertisement -
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये उरुस दरम्यान इतर धर्मियांकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न झाल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेत आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापनेचा आदेश दिला आहे. त्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.
- Advertisement -