- Advertisement -
राज्याते सोमवार पासून मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार आहे. या उत्सवादरम्यान झेंडूच्या फुलांना बाजारात मोठी मागणी होत असते. परंतु सतत होणाऱ्या पावसामुळे फुलांचे नुकसान झालंय. याचा फटका नागरिकांनासुद्धा बसला असल्याचे दिसत आहे. झेंडूच्या फुलांची आवक घटल्याने किंमत शंभर रुपये किलोवर गेली आहे. त्यामुळे ग्राहकांना ज्या ठिकाणी किलोभर फुले घेत होते तिथे ते अर्धाकिलो घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे व्यापाऱ्यांचं देखील मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
- Advertisement -