- Advertisement -
राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, याचा सर्वात जास्त फटका हा हातावर पोट असणाऱ्यांना बसला आहे. त्यांना एक वेळचे अन्न मिळणे ही कठिण झाले आहे. यामध्ये कचरा वेचणारे कामगार, बांधकाम कामगार यांचा समावेश आहे. यांना पोटभर अन्न मिळावे आणि काजुपाडा बोरिवली परिसरात कोणीही उपाशी राहू नये, यासाठी गरजूंना कडक निर्बंधांच्या काळात बोरिवली शिवसेना शाखा क्रमांक ११चे शाखाप्रमुख सुबोध माने यांनी स्वखर्चाने काजूपाडा माने कंपाऊंड येथे मोफत अन्न वाटप करण्यास सुरुवात केली आहे.
- Advertisement -