- Advertisement -
कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासीयांच्या सोईसाठी १५० रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार अजून रेल्वे गाड्यांची व्यवस्था कोकणात जाण्यासाठी केली जाईल अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलीय. ते जालन्यात बोलत होते. कोकणात येण्यासाठी ७ तारखेला दादर स्टेशनवरून कोकणात जाण्यासाठी स्वतंत्र मोदी रेल सोडण्यात येणार असल्याचं देखील ते म्हणाले.
- Advertisement -