- Advertisement -
ओबीसी मंत्री विजय वडेडट्टीवार व अजित पवार यांनी नुसती वाहवा मिळवण्यासाठी मागासवर्ग आयोगासाठी ४५० कोटींची घोषणा केली.वास्तवात फक्त साडेचार कोटी दिले. पण ते खर्च करण्याचे आदेश ही आयोगाला मिळाले नाहीत. वडेट्टीवारांनी टक्केवारीसाठी “फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं” अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केलीये.ओबीसींच्या नावावर मंत्रीपद भूषवतात आणि प्रस्थापितांसाठी पोपटपंची करतात. असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.
- Advertisement -