- Advertisement -
गेल्या मार्च २०२० पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याबाबत सरकारकडून अनेकदा नियमावली जाहीर करण्यात आली. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहून सुरु करण्यात आलेली नववी ते बारावीपर्यंत शाळा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वीच कोव्हिड-मुक्त क्षेत्रात आठवी ते बारावीपर्यंत शाळा सुरु करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर पुन्हा एकदा युटर्न घेत शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, आता पुन्हा एकदा सुधारित नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ही नियमावली काय आहे जाणून घेऊया.
- Advertisement -