- Advertisement -
आयपीएल २०२० स्पर्धेचा आज अंतिम सामना रंगणार असून गतविजेत्या मुंबई इंडियन्ससमोर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान असणार आहे. मुंबई हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी आतापर्यंत विक्रमी चार वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. त्यांनी यंदाच्या मोसमात दमदार कामगिरी करताना १४ पैकी ९ साखळी सामने जिंकत गुणतक्त्यात पहिला क्रमांक पटकावला. तसेच त्यांनी क्वालिफायर-१ च्या सामन्यात दिल्लीचा ५७ धावांनी धुव्वा उडवत अगदी सहजपणे अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, दिल्लीचा संघ या पराभवाची परतफेड करत पहिल्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकण्यात नक्कीच उत्सुक असेल.
- Advertisement -