- Advertisement -
श्रेयवादातून उद्घाटन सोहळा पार पडलेला खारेगाव उड्डाणपूलाचे काम अर्धवट असल्याने गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या उड्डाणपूलाच्या ठिकाणी नागरिकांना पादचारी पूल देखील उभारण्यात आला आहे. परंतु या पादचारी पुलावर उतार असल्यामुळे या पुलावर पावसाळ्यात शेवाळ साचणार आहे. त्याचबरोबर वयोवृद्ध आणि अपंगांना या पादचारी पुलावर उद्वाहन (लिफ्ट) उपलब्ध नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप देखील यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
- Advertisement -