- Advertisement -
ठाणे शहरातील कळवा उड्डाण पुलावर एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ठाणे वाहतूक पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला वाचविण्यात यश आले आहे. या व्यक्तीचे नाव भगवान कांबळे असून मुलाचे निधन आणि कर्जबाजारीपणाच्या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समजत आहे.
- Advertisement -