- Advertisement -
मकर संक्रांतीनिमित्त भारतात अनेक ठिकाणी पतंग उडवली जाते. मुंबईत देखील गच्चीवर, चाळींच्या पत्र्यावर पतंग उडविण्याची परंपरा आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मस्जिद बंदर येथील पतंगाची बाजारपेठेत विविध रंगाचे, आकृतीचे पतंग दाखल झाले आहेत. मात्र यावेळी प्लास्टिक बंदी असल्यामुळे ग्राहकांनी कागदाच्या पतंगांना पसंती दिली आहे. तसेच महागाईचा परिणाम देखील बाजारपेठेवर जाणवत आहेत. मायमहानगरच्या प्रतिनिधी भाग्यश्री भुवड यांनी याचा आढावा घेतला आहे.
- Advertisement -