- Advertisement -
राज्याचा कारभार जिथून चालवला जातो, त्या मंत्रालयातील उपहारगृह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. हा धक्कादायक प्रकार मंत्रालयात त्रिमूर्ती पुतळ्याच्या मागे घडल्याचे समोर आले आहे. हा प्रकार समोर आल्याने पुन्हा एकदा राज्य सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. मंत्रालयात कडेकोड बंदोबस्त असतानाही दारुच्या बाटल्या आल्या कुठून असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
- Advertisement -