- Advertisement -
नाशिकच्या कुसुमाग्रज नगरीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनावर बुधवारी अचानक बरसलेल्या बेमोसमी पावसाने पाणी फेरलं. त्यामुळे नियोजनात काही प्रमाणात बदल करण्यात आलेत. यासंदर्भात बोलताना पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळांनी पावसामुळे संमेलनाच्या आयोजनावर कोणताही परिणाम होणार नसल्याची ग्वाही दिली. याशिवाय, संमेलनात कोणतेही राजकीय मतभेद नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
- Advertisement -