- Advertisement -
आरोग्य विभागाच्या परीक्षा घेण्याची जबाबदारी न्यासा कंपनीला का देण्यात आले? असा प्रश्न विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानपरिषदेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारला होता. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संपूर्ण माहिती दिली आहे. न्यासा कंपनीला मुल्यांकनाच्या आधारावर निवडण्यात आले होते. ५ कंपन्यांच्या परीक्षा घेतल्यानंतर जास्त गुण मिळ्यामुळे न्यासा कंपनीला निवडण्यात आले होते असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
- Advertisement -