- Advertisement -
कल्याण डोंबिवलीमधील आरोग्य सेवेत असणारे तसेच अत्यावश्यक सेवेकरता मुंबई जाणाऱ्यांची सोय मुंबईमध्ये करण्यात यावी अशी मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. केडीएमसीतून मोठ्या प्रमाणात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मुंबईला जातात. अशावेळी मुंबईतून आलेल्या सेवेतील कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाल्याचे वाढत आहे. त्यामुळे सरकारने याचाही गांभिर्याने विचार करावा, असे पाटील यांनी म्हटले आहे.
- Advertisement -