- Advertisement -
गेल्या पंधरा वर्षांच्या प्रवासात राज ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावरच हा पल्ला गाठता असल्याचा एक रेकॉर्डेड संदेश कार्यकर्त्यांना उद्देशून प्रसिद्ध केला आहे. पक्षाच्या पंधरा वर्षाच्या कालावधीत अनेक खाचखळगे पाहिले, अनेक जण सोडून गेले, पण जे सोबत आहेत ते सह्याद्रीच्या कड्यासारखे त्यांना मी कधीच विसरू शकणार नाही. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मी नक्कीच घडवेन असाही विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. येत्या दिवसात पक्षाचे यश हे तुमचेच असेल असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. कोरोनाच्या संकटामुळे मला तुमच्याशी भेटता येत नाही. पण लवकरच आपण भेटू असेही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले. तसेच पक्षाच्या नोंदणी मोहीमेतही सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केली.
- Advertisement -