- Advertisement -
पाकिस्तानी गायक अदनान सामीला भारत सरकारने पद्म पुरस्कार जाहीर केल्यामुळे त्यावरून आता उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याला तीव्र विरोध केला असून हा पुरस्कार मागे घेण्याची मागणी केली आहे. तसेच, जर तसं झालं नाही, तर अदनान सामीच्या कार्यक्रमांमध्ये गोंधळ झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.
- Advertisement -