- Advertisement -
मुंबई मध्ये एका इमारतीत अनेक कुटुंब वास्तव्य करतात. कोरोना बाधित एक रुग्ण सापडला की तो राहत असलेली इमारत तसेच त्याच्या आजूबाजूच्या इमारती सुद्धा सीलबंद केल्या जातात. त्यांना घराबाहेर पडता येत नाही. अशावेळी घरात असलेलं अन्नधान्य संपत आलेलं असतं. प्रभादेवी, दादर, माहिम येथील ज्या इमारती प्रशासनाने सीलबंद केल्या आहेत त्यांच्या घरी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व माजी आमदार नितीन सरदेसाई यांच्या मार्फत अन्नधान्य पोहचवण्यात आलं.
- Advertisement -